महाराणा प्रताप यांची मराठी माहिती | maharana pratap history in marathi & maharana pratap marathi quotes

महाराणा प्रताप यांच्याबद्दल थोडक्यात माहिती & maharana pratap marathi quotes


maharana pratap marathi quotes

आज या पोस्ट मधे राजपुतांचा राजा महाराणा प्रताप यांच्या बद्दल थोड जाणून घेऊया. त्यांच्या काही अश्या गोष्टी ज्या सर्वांना आवडतात. ते कसे होते आणि त्यांची लाईफ बद्दल थोड.

राजपुतांचा सर्वश्रेष्ठ राजा म्हणून महाराणा प्रताप ओळखले जातात. अकबराला पाणी पाजणारा आणि ज्याच्या मृत्यूमुळे स्वतः अकबरही हळहळला.

मोगली फौजांसमोर त्यांनी कधीही गुढघे टेकले नाहीत, आपल्या भूमीवर नितांत प्रेम करणारा हा राजा. पण आपल्याला त्यांच्याबद्दल खूप कमी माहिती असते आणि म्हणूनच आम्ही आज तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत महाराणा प्रताप यांच्याबद्दल माहित नसलेल्या काही रंजक गोष्टी…

१. अकबर आणि महाराणा प्रतापमधल्या संघर्षाची परिणिती म्हणजे हळदीघाटचं युद्ध. हे युद्ध होऊ नये आणि महाराणा प्रताप यांनी मोगलांना सामील व्हावे म्हणून अनेकदा त्यांना अकबराकडून आमिष दाखवण्यात आलं. अर्धा हिंदुस्तान देण्याचा प्रस्ताव आला पण महाराणा प्रताप शेवटपर्यंत आपल्या निर्णयावर कायम राहिले.

२. ८० किलोचा भाला, १२ किलोचे कवच, २ तलवारी असं युद्धातल्या त्यांच्या पेहरावाचं एकूण वजन तब्बल २०८ किलो होतं. वाचून विश्वास बसणार नाही. पण या वस्तू आजही मेवाड राजघराण्याच्या म्युझियममध्ये तुम्ही पाहू शकता.

३. महाराणा प्रताप यांनी बहलोल खान याच्यावर केलेल्या वाराने त्याचे आणि त्याच्या घोड्याचे दोन तुकडे झाल्याचं इतिहासकार सांगतात

४. अकबराच्या नवरत्नांपैकी एक म्हणजे कृष्णाचे निस्सीम भक्त ‘रहिम दास’ यांना त्यांच्या जनानखान्यासोबत बरोबर अमर सिंह (प्रतापांचा मुलगा) यानं ताब्यात घेतलं. जेव्हा महाराणा प्रतापांना ही बातमी समजली तेव्हा त्यांनी सर्व स्त्रियांना सन्मानपूर्वक सोडून दिलं.

 ५. महाराणा प्रताप यांनी राजकीय कारणास्तव ११ स्त्रियांशी लग्न केली.

६. चेतक आणि महाराणा प्रताप यांच्यामधलं नातं काही अजबच होतं. चेतक हा घोडा इतका वेगात पाळायचा कि त्याला उडणारा घोडा म्हणून ओळखलं जायचं. युद्धात मुघल सैन्य मागावर असताना जखमी प्रतापसिहांना घेऊन चेतक पळत राहिला.

७. महाराणा प्रताप हे आपल्या समवेत दोन तलवारी बाळगत हे आपल्याला माहित असेलच. त्यांना ही कल्पना त्यांच्या मातोश्री जयवंताबाई यांनी दिली होती.

८. त्यांनी अशी शपथ घेतली होती कि जोवर चित्तोड परत मिळवणार नाही तोवर मी जमिनीवर झोपेन आणि अत्यंत साधं अन्न खाऊन दिवस काढेन. शेवटी त्याचं हे स्वप्न पूर्ण होण्याआधीच त्यांच्या मृत्यू झाला.

९. त्यांची आठवण म्हणून आजही राजपूत जेवताना ताटाखाली झाडाचं पान ठेवतात आणि झोपताना उश्याखाली गवत ठेवून झोपतात.  त्याचबरोबर बुंदेलखंड भागात गवताचा वापर करून बनवलेली भाकरी प्रसिद्द आहे.

maharana pratap marathi quotes

माणसाचा अभिमान आणि स्वाभिमान ही त्याची सर्वात मोठी कमाई करणारी बाब आहे म्हणूनच त्याने त्याचे नेहमीच रक्षण केले पाहिजे. “~ महाराणा प्रताप


आपल्या कर्तव्यासाठी आणि सर्व जगाच्या कल्याणासाठी प्रयत्नशील माणसाला वेळोवेळी आठवण येते. “~ महाराणा प्रताप


अन्याय, चूक इत्यादींचा नाश करणे हे संपूर्ण मानवजातीचे कर्तव्य आहे. “~ महाराणा प्रताप


सतत, आपले ध्येय, परिश्रम आणि आत्मशक्ती लक्षात ठेवल्यास यशाचा मार्ग सुकर होतो. “~ महाराणा प्रताप


सत्य, परिश्रम आणि समाधानी जीवन आनंदी जीवनाची साधने आहेत. परंतु अन्याय रोखण्यासाठी हिंसाचार देखील आवश्यक आहे. “~ महाराणा प्रताप


त्रास, पीडा आणि संकट आयुष्य मजबूत आणि अनुभवी बनवतात. त्यांच्यापासून घाबरू नका, परंतु त्यांच्याबरोबर जगता आल पाहिजे. “~ महाराणा प्रताप


स्वत: आणि त्याच्या कुटूंबियांशिवाय जो कोणी आपल्या राष्ट्राबद्दल विचार करेल तोच खरा नागरिक आहे. “~ महाराणा प्रताप


माणूस केवळ आपल्या कष्ट आणि त्रासातूनच आपले नाव अमर करू शकतो. “~ महाराणा प्रताप


राज्यकर्त्याचे पहिले कर्तव्य म्हणजे त्याच्या राज्याचा गौरव आणि सन्मान वाचवणे. “~ महाराणा प्रताप


जरी आपल्यास सापावर प्रेम असेल तरीही ते त्याच्या स्वभावाप्रमाणे चावतील. “~ महाराणा प्रताप


हल्दीघाटीच्या युद्धाने माझे सर्व काही गेले. पण त्यामुळे माझा अभिमान आणि अभिमान वाढला. ~ महाराणा प्रताप


मित्रांनो पोस्ट कशी वाटली ते comment करून नक्की सांगा. धन्यवाद 

Leave a Comment